तीर्थक्षेत्र राक्षसभुवन | Rakshasbhuvan

राक्षस भुवन बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्या मधे गोदावरी तिरा वरती वसलेले हे गाव आहे. संपूर्ण भारत देशामध्ये शनी महाराजांचे साढे तीन पीठे आहेत त्या मधे राक्षसभुवन ( Rakshasbhuvan ) उज्जैन, नस्तान, हि पूर्ण पीठे आहेत तर बीड हे अर्धे पीठ मानले जाते. राक्षस भुवन हा पहिला दंडक अरण्याचा भाग होता, त्या मुळे येथे महर्षी गौतम, अगस्ती, दधीची, पिप्पलाद, दक्षप्रजापती, अत्री ऋषी येथे वास्तव्यास होते. दत्तगुरुंचे हे जन्मस्थान आहे.

दत्तगुरुंची इतर तीर्थ हि त्यांच्या मानवी देह आवतराची असून हे तीर्थ त्यांचे जन्म स्थान आहे. या ठिकाणी ब्रह्म, विष्णू, आणि महेश या त्रिदेवांनी माता अनुसयाला आशीर्वाद दिला म्हणून वरद (आशीर्वाद ) दत्तात्रेय असेहि संबोधले जाते, हे दत्तगुरु चे आदी पीठ मानले जाते.हे अतिशय प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे अगस्ती तीर्थ, गणेश तीर्थ सोमेश्वर तीर्थ, कालिका तीर्थ,नृसिंहतीर्थ, आत्मतीर्थ अशी आठ तीर्थ आहेत. भारतामध्ये जसे अष्टविनायक आहेत, त्याच प्रमाणे एकवीस स्वयंभू गणेश पीठ आहेत, त्या पैकी एक स्वयंभू गणेश पीठ हे राक्षसभुवन येथे असून त्याची स्थापणा हि दत्तगुरु नी केलेली आहे. विज्ञान गणेश असे या गणेशास संबोधले जाते.

देशभरातील सर्व महादेव मंदिरात महादेवाचे वाहन नंदी महाराज विराज मान असतात. पण देशातील एकमेव नंदी नसलेले सोमेश्वर मंदिर येथे आहे. तसेच दत्त मंदिराजवळ दधीची ऋषी चे दाधेश्वर नावाचे शिव मंदिर आहे.राक्षस भुवन चे नाव इतिहासाच्या पानावरती कोरले गेलेले असून निजाम आणि पेशवे यांच्या मधे 10 ऑगस्ट 1763 रोजी राक्षस भुवन येथे लढाई झाली, या लढाई मधे निजामाचा दारुण पराभव झाला. या लढाई मधे तीन शहाणे पैकी एक विठ्ठल सुंदर मारला गेला.

राक्षसभुवन येथे शनी मंदिरामध्ये नवग्रहाची स्थापणा केलेली असल्या मुळे, जन्म, लग्न कुंडली मधले दोष निवारण येथे केले जाते, तसेच येथे कालाची स्थापणा केलेली असल्यामुळे कालसर्प शांती येथे केली जाते. हिरण्यकश्यपू याचे नातू वातापी आणि इलवल यांनी अनेक ऋषी मुनी यांची हत्या केलेली होती, त्यांना मुक्ती मिळण्यासाठी अगस्ती ऋषी नी येथे आत्मतीर्थाची स्थापन केली आणि त्यांना मुक्ती दिली. आजही येथे पितृमुक्ती आणि श्राद्धविधी केले जातात. महाराष्ट्र मधून लाखो भाविक कालसर्प योग, पितृदोष,श्राद्ध साडेसाती, आपल्या पीत्रांची मुक्ती व्हावी म्हणून या पवित्र तीर्थ क्षेत्राला भेट देत असतात.

शनीमहाराज माहात्म्य :

प्रभू श्रीराम चंद्र चौदा वर्ष वनवासात असताना दंडक अरण्यात आले. तेथे त्यांची भेट अगस्ती ऋषी सोबत झाली, श्री रामचंद्रानी अगस्ती ऋषी ना सांगितले , कसे त्यांना राज्य सोडावे लागले, सर्व सुखाचा त्याग करून चौदा वर्ष वनवासाला यावे लागले, हे सर्व दुःख माझ्या वाट्याला का आले, तेव्हा अगस्ती ऋषीनी रामचंद्रांना सांगितले तुम्हाला शनी महाराजांची साडेसाती चालू आहे, त्या मुळे या यातना तुम्हाला भोगाव्या लागत आहे. अगस्ती ऋषीच्या सांगण्यावरून श्रीरामचंद्रानी तेथे शनी देवाची स्थापणा केली केली आणि शनी देवांची मनोभावे पूजा करून शनी महाराजांना विनंती केली, कली युगामध्ये मानवाचे आयुष्य फार कमी आहे.

त्याचे 14 वर्ष साडेसाती मधे जर गेले त्याच्या कडे फार कमी वेळ राहतो, म्हणून या साडेसातीचा कालखंड कमी करून साडेसात वर्ष करण्यात आला आणि या ठिकाणी जो कोणी मनुष्य मनोभावे पूजा अर्चना करेल त्याच्या वरती साडेसाती चा प्रभाव कमी होईल अशी भाविकांची श्रद्धा आहे.या शनी पिठाविषयी अजून एक अख्यायिका अशी आहे. उज्जैन चा राजा विक्रमादित्य यांना साडेसाती सुरु झाली, राजाचे राज्य आणि वैभव निघून गेले .

राजाने राक्षसभुवन येथे अडीच वर्ष तेल घाना चालवला, राज्यावरती शनिदेव प्रसन्न झाले आणि गेलेले वैभव त्यांना परत मिळाले. अजून हि एक कथा प्रचलित आहे की हिरण्य कश्यपू चे नातू वातापी आणि इलवल यांनी आपल्या आजोबाचा जसा वध झाला तसा होऊ नये म्हणून येथे अनेक ऋषी मुनींना ब्राम्हण बनून हत्या केली, त्यांच्या त्रासाला कंटाळून ऋषी मुनी अगस्ती ऋषी ला शरण आले.

अगस्ती ऋषी नी सांगितले यांचा संहार शनी देव करतील, परंतु शनिदेवानी सांगितले यांचा वध हा अगस्ती ऋषी च्या हातून होईल, जो पर्यंत शनी देव त्यांच्या राशीला वक्री येत नाही तो पर्यंत आपण प्रतीक्षा करावी, आणि अखेर तो दिवस उजाडला वातापी ने ब्राम्हनाचे रूप धारण करून इलवल हा अन्नप्रसाद झाला आणि अगस्ती ऋषी ना भोजनाचे आमंत्रण दिले, अगस्ती ऋषी ने अन्न ग्रहण केले व पोटामध्ये अग्नी निर्माण करून त्याचा अंत केला, आपला भाऊ अजून कसा बाहेर आला नाही म्हणून, वातापी पळत सुटला आणि समुद्राला शरण गेला समुद्राने त्याला आपल्या मधे सामावून घेतले, समुद्राला गर्व झाला, अगस्ती ऋषी नी सगळा समुद्र प्राशन केला आणि वातापी चा संहार केला अशी हि दंत कथा प्रचलित आहे.

तसेच भगवान श्रीकृष्णाने युधिष्टराला याच ठिकाणी पूजा करण्यास सांगितले होते. या मंदिरामध्ये कालाची पूजा केल्याशिवाय शनिदेवांची पूजा सपन्न होत नाही, येथे शनी,काल, यमी, तसेच राहू केतू आणि ब्रहस्पती यांची देखील मूर्ती आहेत. रक्षे भुवन या ग्रंथामध्ये शनी देवाच्या माहात्म्य याचा उल्लेख आढळून येतो. राक्षस भुवन चे नाव रक्षे भुवन असे नाव होते कालांतराने त्याचे नाव राक्षस भुवन असे पडले.

दत्त गुरुचे मंदिर :
अत्री ऋषी च्या आश्रमाच्या ठिकाणी हे दत्तमंदिर आहे. हे मंदिर पुरातन असून याचे बांधकाम हे दगडा मधे केलेले आहे. हे मंदिर एखाद्या आश्रमा प्रमाणे भासते, याचा गर्भगृह खोल भागात असून त्या मधे दत्तात्रेयांची एक मुखी दगडाची मूर्ती आहे. मूर्ती च्या डोक्यावरती नागाचा फना आहे, अशी फना असलेली मूर्ती संपूर्ण भारता मध्ये फक्त येथेच पहावयास मिळते. या मूर्तीस सहा भुजा असून, विष्णू च्या हातात असणारे शंख आणि चक्र या मूर्तिच्या वरील दोन हातामध्ये आपणास पाहवयास मिळते, मधील हातामध्ये महादेवा प्रमाणे डमरू आणि त्रिशूल आहे आणि खालील दोन हातामधे ब्रम्हाजी चे कामंडलू आणि माळ पाहवयास मिळते.

दत्तप्रभू ची अतिश सुंदर आणि मोहक मूर्ती आहे. हे मंदिर दत्तगुरुचे जन्म स्थान असल्यामुळे या मंदिराला कळस नाही.या मंदिराच्या वरील बाजूस दुर्मिळ असे दगडी दत्त यंत्र आहे. या यंत्राची रचना तीन भागात केलेली आहे, भारतामधे फक्त याच मंदिरा मधे आपणास दत्त यंत्र पाहवयास मिळते. येथे अन्नपूर्णा मातेचे मंदिर असून, मातेच्या हातामध्ये शस्त्रअस्त्र असलेली एकमेव मूर्ती आपणास पाहवयास मिळते.दंडकअरण्यात गोदावरी तिरावरती अत्री ऋषी आणि अनुसया माता यांचा आश्रम होता. अनुसया माता हि तिन्हीलोकात सर्व श्रेष्ठ पतिव्रता होत्या. एकदा ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या पत्नी ला गर्व झाला.

आमच्या सारख्या पतिव्रता या तिन्ही लोकात कोणीही नाही, तेव्हा नारदाने या तिघीना सांगितले पृथ्वीतलावरती अत्री ऋषी ची पत्नी सर्वात श्रेष्ठ पतिव्रता स्त्री आहे, तिनही देविना राग आला आणि त्यानी आपल्या पतीस पृथ्वी वरती जाऊन माता अनुसयाचे पतिव्रता व्रताची परीक्षा पाहण्याचा हट्ट केला. तीनही देवांनी आपल्या अर्धांगिनीचा हट्ट पुरवण्यासाठी माता अनुसया यांची परीक्षा पाहण्यासाठी साधूच्या वेषात पृथ्वी वरती अवतरले. त्यानी मातेस सांगितले माता आम्हास भूक लागली आहे आम्हास भोजन द्यावे. पण आमची एक अट आहे आम्हास तुम्ही नग्न अवस्थेत भोजन वाढावे. देवांनी मातेस सांगितले तुम्हाला आमची अट मान्य असेल तर ठीक नाही तर आम्ही जातो. अनुसया माता धर्म संकटामधे पडली.

आलेले अतिथी देवा प्रमाणे असतात ते परत उपाशी गेले तर पाप घडेल, आणि नग्न अवस्थेत भोजन वाढले तर आपले पतिव्रताव्रत भंग होईल. विचार करत असताना तेथे अत्री ऋषी आले आणि मातेने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. अत्री ऋषी नी आपल्या दिव्य दृष्टीने पहिले की साक्षात परमेश्वर आपल्या घरी आले आहेत. त्यांनी आपल्या कामंडलू मधील पाणी त्यांच्या अंगावरती शिंपडले आणि तिनही देवांचे लहान बाळा मधे रूपांतर झाले.

अनुसया मातेने त्यांना आपले पुत्र मानले आणि लहान बालकास आपल्या पुत्राला नग्न अवस्थेत त्यानी जेवू घातले. त्या मुळे आलेल्या अतिथी ची अट हि पूर्ण झाली आणि त्यांच्या पतिव्रताभंग हि झाला नाही. थोडे दिवस गेल्या नंतर तीनही देवी चिंतेत पडल्या की आपले पती आले कसे नाहीत. त्यांना पाहण्यासाठी त्या अत्री ऋषी च्या आश्रमात आल्या, त्यांनी पहिले आपले पती हे बालक रूपात आहेत. तिनही देवीनी अनुसया मातेची माफी मागितली आणि त्यांना परत करण्यासाठी विनवणी केली. तीनही बालकामधील मूळ अंश काढून दिला आणि बालके तशीच ठेवली, ती तीन बालके म्हणजे दत्तात्रेय, ध्रुवात्रेय आणि चंद्रात्रेय, ब्रह्म विष्णू आणि महेश या देवांनी अनुसया मातेस आशीर्वाद दिला म्हणून या तीर्थक्षेत्राला वरद दत्तात्रेय म्हणून हि ओळखले जाते.

विज्ञान गणेश मंदिर :
भारतामधे 21 स्वयंभू गणेश पीठ असून त्या मधले हे एक स्वयंभु गणेश पीठ आहे. याचा उल्लेख अनेक ग्रंथ पुराना मधे आढळतो गोदावरी माहात्म्य, तसेच गाडगीळ यांचे गणेशकोष पान नंबर तीनशे साठ वरती या गणेश पिठाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच स्वतः दत्तगुरूंनी या गणेशाची स्थापना केलेली आहे. हे स्थान अति प्राचीन असून त्याची आपण माहिती पाहणार आहोत. अत्री ऋषी आणि माता अनुसया यांचे तिनही पुत्र मोठे झाले, पण ध्रुवात्रे आणि चंद्रात्रे यांचे मन काही येथे रमेना त्यांनी आपल्या माता पित्यांची आज्ञा घेऊन त्यांनी हिमालयाकडे प्रस्थान केले.

तसेच दत्तात्रेय यांनी या ठिकाणी घोर तापश्चर्या केली अनुष्ठान केले आणि या विज्ञान गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केली. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणेश पिठाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रा मधे आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरास शंभर एकर जमीन दान देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे इतिहासामध्ये याची नोंद आहे.

Leave a Comment