भगवद्गीता सार | Bhagavad Gita Sar

 आपण सर्व आत्मा म्हणजे सूक्ष्मजीव आहोत. आणि हे आयुष्य म्हणजेच सर्व आत्म्यांसाठी एक परीक्षा आहे. आपल्या आतून सर्व चांगल्या कलाकृतींना बाहेर काढण्यासाठी आणि ती परीक्षा पास होण्यासाठी भगवद्गीता ( Bhagavad Gita) एक चांगला ग्रंथ आहे. भगवद्गीतेचे एकूण 18 अध्याय असून ते संस्कृत मधून भगवान परमात्म्याने म्हणजेच श्रीकृष्णांनी संस्कृत भाषेमधून सांगितलेले आहेत. सध्याच्या काळानुसार संस्कृत भाषा रोजच्या जीवनामधून लोप पावत गेली आहे.

आणि हळूहळू मनुष्य या ज्ञानापासून दूर झाला आहे भगवद्गीतेचे सोप्या भाषेमध्ये भाषांतर केले गेले. याच प्रयत्नाने आपण भगवत गीतेचे सार मराठी मधून पाहणार आहोत. भगवद्गीतेच्या काही महत्त्वाच्या श्लोकांचे वर्णनही आपण पाहूया.

हे ज्ञान परमात्म्याने भगवान श्रीकृष्णांच्याद्वारे सर्वात मोठे धर्मयुद्ध महाभारताची रणभूमी कुरुक्षेत्र येथे अर्जुनाला 5000 वर्षांपूर्वी सांगितले आहे. ती वेळ अशी होती की त्यावेळी धर्माचे वेळोवेळी उल्लंघन झाले होते. परमात्म्याची भीतीसुद्धा मनुष्याला वाटत नव्हती. त्यावेळी  लालसेपोटी भावा भावांनी एकमेकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर एका विवाहित स्त्रीला भर मंडपात आपल्यापेक्षा मोठ्या लोकांसमोर अपमानित केलं गेलं, मनुष्य जाती धर्मयुगातून कलियुगात जाण्याच्याआधी रणभूमीत युद्धाच्या काही क्षणापूर्वीच परमात्म्याने गीता ही भगवान श्रीकृष्ण यांच्याद्वारे मनुष्य जातीच्या कल्याणासाठी सांगितली होती.

जसे की तुरा मोजेसला, कॉसमस जीजसला, आणि कुरान मोहम्मद यांना दिली. गीता हा ग्रंथ परमात्मा द्वारा दिलेला ग्रंथ आहे. जो कोणा एका धर्मासाठी नाही तर तो पूर्ण मनुष्य जातीसाठी आहे. कारण आत्म्याला परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टी संदर्भात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा कायद्याच्या संदर्भात सांगतात कि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचे पालन केलेच पाहिजे. त्याचे रक्षण केले पाहिजे आणि ते याच कायद्याच्या आधारावर आत्म्याने शरीराचा त्याग केल्यावर त्याची परीक्षा होईल आणि ही परीक्षा पास झाल्यावर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता होईल. याकरिता सांगितलेले आहे.

परमात्मा भगवद्गीतेत सांगतात की सगळ्याची सुरुवात मीच आहे. सुरुवातीच्या आधी सुद्धा मीच होतो.आणि सर्व संपल्यावर सुद्धा मीच असेल. सर्व माझ्यात आहे आणि मी सर्वांच्यात आहे. जे तुम्ही स्पर्श करता पाहता ज्याची चव घेता किंवा जे ऐकू आणि बघू शकता ते सर्व मीच आहे. नदी, पर्वत, सूर्य,चंद्र,तारे, ग्रह हे सर्व मीच निर्माण केले आहे. देव,दानव आणि मनुष्य हे सर्व सुद्धा मीच निर्माण केले आहे. मी सर्वव्यापी आहे आणि मी सर्वत्र वास करतो. सर्व चराचरामध्ये मी आणि फक्त मीच आहे. मीच ब्रह्मा बनून सर्व काही निर्माण करतो. आणि रुद्र बनून सर्व नष्ट करतो. मी ही सृष्टी अशीच निर्माण करीत राहील. आणि तिचा विनाश करत राहील की ज्यामुळे आत्म्याला जन्म आणि मृत्यू पासून मोक्ष मिळवण्याची संधी मिळेल. आणि त्यामुळे तो सदैव परमात्म्याबरोबर राहील.

भगवत गीतेत सांगितले आहे की या मोठ्या परीक्षेसाठी परमात्म्याने प्रकृतीची पाच तत्वांमध्ये विभागणी केलेली आहे. जसे की अग्नि, जल,पृथ्वी,आकाश आणि वायु ज्याला आपण स्पर्श करून ,चव घेऊन आणि वास घेऊन बघू आणि समजू शकतो. आत्मा या पाच इंद्रियांमुळे ओळखला जात नाही. आत्मा या पाच इंद्रियांबरोबर असा आहे जसे की एक लोखंडाची साखळी की जिला आपल्या निर्मिती बद्दल काहीच माहित नाही. भगवान श्रीकृष्णाने भगवंताचे विशाल रूप पाहण्यासाठी अर्जुनाला दिव्य डोळे दिले.

भगवद्गीता सांगते की आत्मा हा अविनाशी आहे आणि त्याला कोणीही मारू शकत नाही,जाळू शकत नाही,बुडवू शकत नाही आणि तोडूही शकत नाही. परंतु आत्म्याला परमात्म्यासोबत कायमस्वरूपी राहण्यासाठी या परीक्षा रुपी जीवनाला सामोरे जावे लागते. या परीक्षेसाठी परमात्म्यापासून विभक्त झालेल्या एका आत्म्याचा पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे जन्म झालाच पाहिजे

84 कोटी योनींच्या फेऱ्यातून गेल्यावर आत्म्यास माणसाचे शरीर आणि मन प्राप्त होते. या सर्वात मोठ्या परीक्षेस बसण्यासाठी प्रत्येक माणसाला या परीक्षेच्या काळात वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट भावनांच्या चक्रव्यूहा मध्ये आपल्याच मित्र आणि भावंडांसोबत बसवले जाते. ज्यामध्ये प्रत्येक आत्म्याला आपल्यातील क्रोध आणि लोभ हे अवगुन काढून टाकल्यानंतर त्याला सात्विक जीवनामध्ये प्रवेश करण्याची संधी मिळते. आपल्यातील क्रोधाची भावना ही आपल्याला उदास करते आणि आपले नुकसान करते. आणि आपल्यातील लोभी वृत्ती ही आपल्यात इर्षा निर्माण करते. आणि यामुळे दुसऱ्यांचे नुकसान होते.

या परीक्षेमध्ये प्रत्येक आत्म्याला आपल्यातील तामसिक ,राजस हे गुण काढून टाकून आपल्यातील सात्विक गुण ओळखता आले पाहिजेत. सात्विक गुण जे असतात ते आत्म्याला आत्म्याशी जोडून त्यांना एकमेकांवर प्रेम करायला शिकवतात. या परीक्षेवेळी प्रत्येक आत्म्याला जीवनाचे चार खांब म्हणजेच धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष यांचे ज्ञान मिळूनच मुक्ती मिळते. हेच ते द्वार आहेत जेथे आत्म्याला परमात्म्याची ओळख होते. पहिले द्वार आहे धर्माचे. आणि याचे प्रतिक आहे शिर. धर्म तोच आहे की जो गीतेमध्ये आणि वेदांमध्ये सांगितला आहे. जसे की खोटे बोलू नये, चोरी करू नये, देवांचा अनादर करू नये.

दुसऱ्यांचे नुकसान करू नये हे सर्व म्हणजेच धर्म. आणि प्रत्येकात आत्म्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी या धर्माचे पालन आणि रक्षण करणे गरजेचे आहे. दुसरे द्वार आहे अर्थ आणि त्याचे प्रतिक आहे घोडा. ज्यामुळे प्रत्येक आत्म्याला त्याच्या आयुष्यामध्ये आपण या पृथ्वीतलावर असण्याचा अर्थ समजेल. तसेच या आयुष्यामध्ये उपभोग घेणाऱ्या वस्तू आणि नात्यांचा आनंद घेता येईल. चांगला मुलगा किंवा मुलगी, चांगला भाऊ किंवा बहीण, चांगला पती किंवा पत्नी बनवून ही नाती जपता येतील आणि ही परीक्षा पास करता येईल. तिसरे द्वार आहे काम.भगवद्गीते मध्ये सांगितले आहे की प्रत्येक माणसांमधील काम, क्रोध, लोभ, मोह,अहंकार आणि ईर्षा हे सहा भाव दुसऱ्यांना नुकसान पोहोचू शकतात. म्हणून या सहा भावनांना प्रत्येक माणसाने कायम आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे.

कारण यामध्ये वाहवत गेल्याने एखादे काम आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकेल. आणि एक आत्मा समाधान आणि साधेपणामुळे या सहा भावनांवरती कायमचा विजय मिळू शकेल.चौथा दरवाजा आहे मोक्षाचा आणि त्याचे प्रतिक आहे हत्ती. या परीक्षारुपी आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या काही ना काही इच्छा असतात. काही इच्छा ह्या  या एका आयुष्यातच पूर्ण होतात. तर काही इच्छा अपूर्ण राहतात. आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्या आत्म्याला परत पृथ्वीवर यावे लागते. भगवत गीतेत सांगितले आहे की मनुष्याने पृथ्वीवर परत जन्म घेण्याचे मूळ कारण आहे आपल्या इच्छा.

जर आपण कोणतीच इच्छा ठेवली नाही तर आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. हे द्वार माफीचे सुद्धा आहे.ज्यांनी आपल्याबरोबर वाईट केले त्यांना माफ करा. आणि ज्यांचे आपण वाईट केले त्यांना क्षमा मागून आपण मुक्ती मिळवू शकतो. जोपर्यंत आत्मा हे चार दरवाजे म्हणजेच धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष यांना समजून घेत नाही तोपर्यंत त्या आत्म्यांना प्रत्येक वेळी मनुष्य रुपात जन्म घ्यावा लागेल. आणि परीक्षा समताच आत्मा शरीर आणि इतर सर्व गोष्टींचा त्याग करेल. जे काही या आयुष्यात कमावले असेल ते दुसऱ्याचे असेल. आणि आत्मा आपण केलेल्या चांगल्या वाईट कामांच्या निर्णयासाठी निघून जाईल.

त्या आत्म्याच्या चांगल्या वाईट कृत्यांचा हिशोब होतो. आणि केलेल्या चांगल्या कामांसाठी तो स्वर्गात जातो तर वाईट कामासाठी तो नरकात जातो. नरकामध्ये त्या आत्म्याने केलेल्या पापांनुसार शिक्षा मिळते. आणि शिक्षा संपताच परीक्षेमध्ये परत बसण्यासाठी त्या आत्म्याला परत एक शरीर आणि मन मिळते. आणि या प्रत्येक परीक्षेत पुन्हा पुन्हा तेच घडेल.आयुष्यातील चार खांब म्हणजेच धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष यांना समजून घेण्यासाठी प्रत्येक जन्मी आपल्या अनेक जन्मामध्ये केलेल्या कामानुसार त्या आत्म्याला कधी चांगल्या तर कधी वाईट परिस्थितीतून जावे लागेल.

परंतु जोपर्यंत आत्मा हा परमात्मा बरोबर एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. भगवद्गीता सांगते मनुष्य हा आपले शरीर, बुद्धी किंवा मन यातून देवाला प्राप्त करू शकतो. परमात्म्याला मिळवण्यासाठी शरीराद्वारे केलेले काम म्हणजेच कर्मयोग. असे कार्य जे परमात्म्याच्या इच्छेनुसार आणि आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेले असेल.वाल्मिकींनी रामायण लिहून, श्रावण बाळांनी आपल्या आई वडिलांची सेवा करून आणि त्यांना चार धामची यात्रा करून तसेच मदर तेरेसानी आपले प्रेम आणि सेवांच्या माध्यमातून आणि मॅडम क्युरीनी विज्ञानाच्या शोधात आपल्या आयुष्याचे बलिदान देऊन आपल्या कामामधून केले.

 भगवद्गीता सांगते की एकात्म आपल्या बुद्धीने परमात्म्यासोबत एकरूप होतो.त्याला राजयोग  म्हणतात कारण बुद्धी किंवा मस्तक हे सर्व इंद्रियांचा राजा आहे. एक मनुष्य आपली आस्था, श्वास प्रणाली,आसन,अभ्यास,साधना आणि तपस्या यातून परमात्म्याबरोबर एकरूप होऊ शकतो. आणि ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्यातील शक्ती म्हणजे आपल्यातील चक्र आणि कुंडनीलीला समजून घेतले पाहिजे. आत्म्याला ध्यानधारणा करून परमात्म्याबरोबर एकरूप होता येते. शंकराचार्य,स्वामी परमहंस, स्वामी विवेकानंद आणि यांच्यासारखे अनेक योगी अशाप्रकारे चिंतन करूनच परमात्म्याबरोबर एकरूप होऊ शकले.

परमात्मा भगवद्गीतेत म्हणतात, जर एखाद्या आत्म्याला धर्म नाही कळाला, योग नाही कळाला परंतु तो शरण आला तर त्याची सर्व पापे मी माफ करतो. परमात्म्याला आपण मनापासून साथ घालून मिळवण्यालाच भक्तियोग असे म्हणतात. चैतन्य महाप्रभू, मीराबाई आणि भगवान हनुमान ही याची सर्वात मोठी उदाहरणे आहेत. परंतु आत्मा आपल्या असण्याचे मूळ कारण विसरून धर्माचे उल्लंघन करू लागला किंवा पापाच्या रस्त्यावर जाऊ लागला तर त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी परमात्म्याला कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. म्हणूनच भगवद्गीतेचे वाचन केल्याने या आयुष्याचा अर्थ कळतो.

1 thought on “भगवद्गीता सार | Bhagavad Gita Sar”

Leave a Comment