संत गुलाबराव महाराज ( Sant Gulabrao Maharaj ) हे अलिकडच्या काळातील अंध असलेले परंतु प्रखर बुद्धिमत्ता आणि ज्ञान लाभलेले संत होय,ज्यांनी 34 वर्षाच्या आयुष्यात एकूण 134 ग्रंथ रचले. त्यांनी एकूण 6000 पृष्ठांचे वैचारिक लेखन केलेले आहे. जागतिक संत वाड्मयाचा अभ्यास करणारे गुलाबराव महाराज अद्वितीय होते.त्यांच्यासारखी ज्ञानलालसा कुठेही पाहायला मिळत नाही. डार्विन, पेन्सर, बेझर्ट अशा शास्त्रज्ञांच्या थेरीची त्यांनी आधुनिक विवांचा केली होती.
गुलाबराव महाराजांचा जन्म सहा जुलै 1881 मध्ये मोहोळ आडनावाच्या कुणबी पाटील कुटुंबात लोणी टाकळी गावात अमरावती जिल्ह्यामध्ये झाला होता. त्यांचे देहावसन 20/09/1915 रोजी पुणे येथे झाले.त्यांचे बालपण माधान गावामध्ये गेले होते. गुलाबराव महाराजांच्या घरच्यांना त्यांनी पुढे जाऊन आपल्या घरची पाटीलकी सांभाळावी अशी इच्छा असायची. परंतु जन्मानंतर अवघ्या नऊ महिन्यात गुलाबराव महाराजांना कायमचे अंधत्व आले होते. निमित्त ठरले होते एक चुकीचे औषध. गुलाबराव महाराज नऊ महिन्यांचे असताना त्यांचे डोळे आले होते. तेव्हा शेजारच्या आजीने त्यांच्या डोळ्यात टाकण्यासाठी एक आयुर्वेदिक औषध आणून दिले आणि त्यांच्या ते डोळ्यात टाकले. त्याचवेळी त्यांचे डोळे पूर्णच बंद होऊन त्यांना कायमस्वरूपी अंधत्व आले.
एका वर्षाच्या आत या बाळाचे डोळे गेले होते. पुढे वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी आपल्या जीवनाची लीला संपवली होती. त्यांच्या या 34 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे काही केले आणि जे काही सांगितले ते इतके अद्भुत आहे की लोकमान्य टिळकांपासून ते बापूजी अणे आणि लळा पांगारकर यांच्यापर्यंत सर्वांनी म्हटले की “अद्भुत रोम हर्षनंम “ म्हणजे महाराजांचे चरित्र आणि त्यांचे वाङ्मय केवळ अद्भुत आहे.
गुलाबामहाराज दृष्टीहीन होते पण त्यांना ज्ञान मिळविण्याची ओढ खूप होती . अवघडातील अवघड ग्रंथांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खरोखर आश्चर्यकारक होते. गुलाबराव महाराजांनी लहानपणीच दृष्टी नसताना ज्ञानलालसा असल्यामुळे डोक्यावर एक पेटी ठेवून त्यामध्ये अनेक प्रकारची पुस्तके ठेवून माधान अमरावती चांदुर रेल्वे शिरसगाव अशा अनेक ठिकाणी पायी चालत जाऊन लोकांना विनंती करून त्यांच्याकडून सर्व ग्रंथ ऐकून घेतले. दृष्टी नसतानाही त्यांनी भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण ग्रंथ अशा प्रकारे अभ्यासले होते.
तसेच वेद, पुराण, शास्त्र, इतिहास, भूगोल व इतर सारे भक्ती ग्रंथ तसेच भारतीय पाश्चात्यग्रंथ या सर्वांचे अध्ययन केले होते. त्यांनी अशा सर्व ग्रंथाचे केवळ अध्ययन केले नाही तर त्यातून जे साध्य झाले ते अत्यंत सोप्या भाषेत लिहून काढले. गुलाबमहाराज अंध होते पण त्यांनी जी ग्रंथ निर्मिती केली ती अतिशय अविश्वासनीय आहे ,असं जगामध्येही कोणी केलेलं नाही. अशा प्रकारे गुलाबराव महाराजांचे एक वेगळे आश्चर्य आहे. गुलाबराव महाराजांनी सांख्य,योग,न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा अशी सर्व दर्शनं नव्या संदर्भासह मांडून त्यावर आधारित ग्रंथ लिहिले. गुलाबमहाराजांच्या म्हणण्यानुसार भारताला महासत्ता बनायचे असेल तर आपण विज्ञान आणी तंत्रज्ञानात प्रगती करायला हवी .
हे सगळे करण्यासाठी न्याय आणि वैशेशिक ही जी दोन शास्त्रे आहेत त्यातून आजचे भौतिक शास्त्र विकसित करता येईल. त्यायोगे देशाची तंत्रज्ञानातील आणि विज्ञानातील प्रगती आपण साधू शकतो. गुलाबराव महाराजांना समन्वय महर्षी म्हणतात. त्यांनी समन्वयाचे नऊ प्रकार सांगितले आहेत. त्यात त्यांनी सर्व धर्माच्या विवंचना बद्दल समन्वय साधत सर्वधर्म समभावतेचा संदेश दिला.आपल्या देशात अनेक धर्म आहेत अनेक शास्त्र आहेत अनेक सांप्रदाय आहेत अनेक दर्शने आहेत परंतु जेव्हा आपण ते वेगवेगळे समजून त्यामध्ये परस्पर विरोध वाढवतो तेव्हा समन्वयायक दृष्टी नसते.
गुलाबराव महाराजांनी ( Gulab maharaj ) या सर्वांमध्ये परस्पर समन्वय दाखवलेला आहे. समन्वय म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये एक तात्पर्य होय. म्हणजे वेगवेगळे दिसत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये दिसत असलेली एकात्मता. एवढेच नव्हे तर त्यांनी भारतामध्ये असलेल्या धर्म मतांचा समन्वय किंबहुना भारताबाहेरील विचारांचा समन्वय कशाप्रकारे महाराजांच्या विचारांच्या प्रभावाने होऊ शकतो याचा अभ्यास करणे एक नितांत रमणीय गोष्ट आहे.
गुलाबराव महाराज एकही वर्ग शिकलेले नाहीत. मुळात ते कधी शाळेतच गेले नाहीत. असे असताना सुद्धा त्यांनी डार्विनचा सिद्धांत, आईन्स्टाईनचा अनु सिद्धांत, सुभाष चंद्र बोस, वनस्पती शास्त्र या सर्वांचा सखोल अभ्यास करून सटीक लेखन करून ठेवले. एवढी मोठी बुद्धिमत्ता महाराजांकडे होती. ही सर्व दैवी देणगी असल्याचे अनेकांचे मत आहे.
गुलाब महाराज्यांच्या मते डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत चुकीचा आहे, कारण आज केवळ उत्क्रांती नाही तर अपक्रांतीही दिसते. आर्य म्हणजे नेमके कोण, हे कोठून आले, हे सप्रमाण सांगताना सेंट्रल युरोप मधून ते भारतात आले असे त्यांनी सांगितले. महाराजांच्या मते त्यांनीच ही संस्कृती भारताला दिली.त्याकाळी गुलाबराव महाराज लोकमान्य टिळक यांसारख्या अनेक महान थोर लोकांना सांगत असायचे. आज शंभर वर्षानंतर हे जगाला मान्य झाले आहे. गुलाबराव महाराजांच्या बुद्धी आणि ज्ञानाइतकेच महत्त्वाचे त्यांचे जीवन आहे .
ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या म्हणत, त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची अपार भक्ती केली. त्यांनी मधुरा द्वित वर विशेष काम केले. मधुरा द्वित म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वैत वेदांत. गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वैत वेदांत घेऊन त्याला एक शास्त्रीय स्वरूप दिले. गुलाबराव महाराजांची प्रज्ञा हीच त्यांची दृष्टी होती म्हणून त्यांना प्रज्ञाचक्षु असे म्हणतात. त्यांच्या या भक्तीमुळेच संत ज्ञानदेवांचे हे रूप आपण पाहू शकतो. संत गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींचे चे चित्र रेखाटले तेच चित्र आजही प्रमाण आहे.
आकोला येथील चित्रकाराला बोलावून गुलाबमहाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन करत करत ते सांगतील तसे चित्र काढून घेतले होते. त्यामुळे संत गुलाबराव महाराजांचे वारकरी सांप्रदायावर एवढे उपकार आहेत की त्यांच्यामुळेच ज्ञानेश्वर माऊलींचे खरे स्वरूप आपणास पहावयास मिळाले. तसेच गुलाबराव महाराजांनी कठोर कृष्ण भक्ती ही केली होती. पयुषणी नदीच्या काठी त्यांनी 1903 आणि 1904 मध्ये खातीयणी व्रत केले होते.
खातीयणि व्रतात त्यांनी स्वतःला गोपिका आणि श्रीकृष्णाला पती समजून भागवतातील एका मंत्राचा जप करत विवाह करून घेतला होता. अशा प्रकारचे एक व्रत त्यांनी पूर्ण केले होते. तसेच गुलाबामहाराजांनी विपुल काव्य केले. जात्यावरील ओव्या पासून ते ज्ञानेश्वरी वरील टिपणी पर्यंत कितीतरी तऱ्हेच्या काव्यरचना त्यांनी केल्या. तसेच त्यांनी लावण्या,विराण्या आणि गवळणीही रचल्या. गुलाबराव महाराज मधुर स्वरात गात असत.
ते नेहमी ब्रह्मानंदाच्या रसाचा आनंद लुटत असायचे. त्यांच्या लिखाणाचा एक अथांग महासागर त्यांच्या वांग्मय रूपाने आज आपल्या जवळ आहे. त्यांचे वाङ्मय पुढील हजारो पिढ्यांना चिरंतन मानवतेचं एक मूल्य देऊ शकते असे सामर्थ्यवान वाड्मय आहे. गुलाबराव महाराजांनी योगामध्ये सुद्धा नवनवीन प्रक्रिया सांगितलेल्या आहेत.
असे सांगितले जाते की जोपर्यंत गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयातील योगाचा अभ्यास होत नाही तोपर्यंत तुमचा योगाभ्यास सुद्धा अपूर्ण आहे. महाराजांनी त्यांच्या अफाट वाड्मयासोबत अनेक अभिनव अविष्कारालाही जन्म दिला. त्यामध्ये अध्यात्मिक बाराखडी, नवीन नावंग नावाची भाषा, लघु लिपी किंवा सांकेतिक भाषा आणि मोक्ष पटाचाही त्यामध्ये समावेश आहे. लहान मुलांचा अभ्यास अध्यात्मिक बाराखडीतून झाला तर त्यांना आध्यात्मिक शब्दांची तोंड ओळख बालवयातच होईल अशी सुलभ बाराखडी त्यांनी तयार केली.
त्यांनी स्वतःची एक लिपीही तयार केली. खरंतर ज्ञान, विज्ञान किंवा धर्म इतक्यापुरतेच महाराज कधीच मर्यादित नव्हते. शेती संबंधित त्यांनी मांडलेले विचार तितकेच मोलाचे आहेत. महाराज नेहमी असे म्हणायचे की पावसाच्या पाण्यावर जो शेतकरी अवलंबून राहील त्याची पूर्णतः प्रगती आयुष्यात कधी होणार नाही. पाण्याचा अभाव असताना ज्याला तांत्रिक पद्धतीने पाण्याचा शेतीसाठी उपयोग करून घेता येईल तो शेतकरी विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. गुलाबराव महाराजांनी आपलं अख्ख आयुष्य ज्ञान आणि भक्तीसाठी वाहीलं. त्यामध्ये कुठेही चमत्कार किंवा बुवाबाजीला थारा नव्हता.
महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी साधुबोध ( Sadhubodh ) आणि बुवाबाजीचा दंभस्फोट हे दोन ग्रंथ सर्व संप्रदायांच्या लोकांसाठी आदर्श ग्रंथ म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत. गुलाब महाराजांच्या जाण्यानंतर त्यांचा संप्रदाय बाबाजी महाराज पंडित ( Babaji maharaj Pandit ) यांनी 1964 पर्यंत चालवला.