संत सखुबाई | Sant Sakhubai

 पूर्वीच्या काळात सासुरवाशीनेच दुःख काय असतं याची कल्पना आजच्या स्वातंत्र्याच्या काळातील महिलांना कदा कळणार नाही. पूर्वी महिलांचे जीवन फक्त चूल आणि मूल असे होते. परंतु त्याही काळात संत सखुबाईने ( Sant Sakhubai ) ही परंपरा मोडण्याचे धाडस केले होते. भागवत भक्ताला भक्तिमुक्ती वैकुंठाची अभिलाषा नाही फक्त पंढरीला जाता यावे, हरिनाम भजन करता यावे हेच भक्ताचे सुख पांडुरंगाला अनन्य भावाने शरण जाणाऱ्या भक्तांचे असते. अशाच भक्तांपैकी संत सखुबाई एक होत्या.

पाचशे वर्षांपूर्वी संत सखुबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील  पंढरपूर मध्ये एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता. जरी त्या गरीब कुटुंबातल्या असल्या तरी त्या अध्यात्मिक खूप श्रीमंत होत्या. त्यांचे कुटुंब सुद्धा पंढरीनाथ पांडुरंगाची भक्ती भावाने सेवा करणारे होते. लहानपणापासूनच संत सखुबाई पांडुरंगाच्या सेवेसह आईला घर कामात मदत करत असायच्या. बागेतून फुले तोडून आणणे,हार बनवणे, देवपूजा करणे  भगवंतासाठी भोजन बनवणे. तसेच शेणाच्या गवऱ्या थापण्यापासून ते जनावरे सांभाळण्यापर्यंत त्या घरातील पडलेली कामे करायच्या. याशिवाय हरिनाम घेत देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात जाणे,पांडुरंगाचे भजन करणे असा कष्ट करत देवभक्ती करणे हा त्यांचा दिनक्रम असायचा.

पुढे सखुबाई विवाहयोग्य झाल्यानंतर कराड जवळील कृष्णा नदीच्या तटी असलेल्या करवीर गावी एक धनाढ्य पण अतिशय क्रूर आणि कंजूस सावकार या ठिकाणी राहत होता. एक दमडी सुद्धा कुणाला तो दान करणार नाही अशा प्रकारे त्याची वृत्ती होती. या सावकाराचे नाव कृष्णराय असे होते. या सावकाराची पत्नी गयाळीबाई अतिशय आसुरी वृत्तीची होती. तिला नेहमी दुसऱ्यांना छळण्यात,त्रास देण्यात आनंद वाटायचा. ती स्वतःच्या पतीला सुद्धा शिव्या देत असायची आणि पती सावकार कृष्णरायही अशाच स्वभावाचा होता. कृष्णराय आणि गयाळीबाई यांना एक एकुलता एक मुलगा होता. त्याचे नाव उडूराया असे होते.

हा उडूराय म्हणजे आई-वडिलांचा एक बाहुलाच. तो जसे आई-वडील सांगतील तेवढेच आणि तसेच करायचा. एकदा हा उडूराय चुकून पंढरपूरला आला. त्याचे काही निमित्ताने ब्राह्मण परिवारातील सखुबाईच्या घरी येणे झाले.अतिथी देवो भव: या भावनेने सखुबाईंनी उडूरायाचे आदराने स्वागत केले. आणि योग्य प्रकारे अतिथी सत्कार केला. त्याला भोजन दिले  आणि त्यामुळे तो तृप्त झाला. परंतु बाप तसा बेटा या म्हणीप्रमाणे उडूरायाची वाईट नजर सात्विक असणाऱ्या सखुबाईकडे गेली आणि तो सखुबाईकडे आकर्षित झाला आणि उडूरायाने सखुबाईंच्या वडिलांकडे  आपल्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. दिसताना मात्र शांत स्वभाव असलेला उडूरायाला बघून भोळ्या भाबड्या असणाऱ्या या सखुबाईच्या वडिलांनी  चौकशी न करता श्रीमंत कुटुंबामध्ये आपली मुलगी संसार करेल. या हेतूने सखुबाई आणि उडूरायाच्या लग्नाला मान्यता दिली. आणि सखुबाईच्या वडिलांनी आपल्या ऐपतीनुसार सखुबाईचा विवाह उडूराया सोबत करून दिला.

पुढे विवाहाच्या पाच सहा दिवसानंतर सखुबाई आणि तिच्या वडिलांना  या कुटुंबाचे सत्य समजले. श्रीमंत परंतु क्रूर आणि आसुरी स्वभावाच्या लोकांचे हे कुटुंब होते. सखुबाई त्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्या मोलकरींनी सारखे फक्त आणि फक्त घरातील कामेच करत होती. शिवाय एवढी कामे करूनही तिची सासू तिचा खूप छळ करायची. कधी कधी तर तिला मारायची सुद्धा. परंतु सखुबाईने कधीही कोणाला उलट उत्तर न देता आपल्या हरिनामाचा जप भक्तीभावाने करत असत आणि कुटुंबातील सर्व कामे करत असत. सखुबाईंनी विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर आणि भजन वगैरे गायल्यावर तिची सासू गयाळीबाईला खूप राग यायचा.

सखुबाई मात्र हा छळ फक्त सहनच करायच्या. कोणालाही उलट उत्तर त्या देत नसत. मात्र सखुबाई पांडुरंगाला पार्थना करायच्या की, भगवंता आमच्या या घरातल्या लोकांना तुमचा भक्त बनवण्याचा प्रयत्न करा. एक दिवस सखुबाई नदी वरती पाणी भरायला गेल्या असता त्यांना काही वारकरी टाळ मृदंगाचा आवाज करत भजन  गात पंढरीला जाताना दिसले. सखुबाईंनी विचारले की तुम्ही कुठे चालले आहात. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही पांडुरंगाच्या भेटीला चाललो आहेत. वारकऱ्यांचा उत्साह आणि आनंद पाहून अनेक दिवस कष्टी मनाने जगत असलेल्या सखुबाई वारकऱ्यांसोबत गप्पागोष्टी करता करता वारकऱ्यांसोबत चालू लागल्या.

शेजारच्या आयाबाया सखुबाईंना आवाज देत होत्या अगं कुठे चालली. कदाचित पांडुरंगाच्या भेटीची ओढ त्यांच्या मनाला लागल्यामुळे त्यांना या बायकांचा आवाजही येत नसावा. काही बायांनी ही खबर तिच्या सासूला कळवली. मग काय तिची सासू-धावत पळत येऊन सखूच्या हाताला पकडून ओढत ओढत त्यांना घरी घेऊन आली.आणि सखुबाईला तिने बांधून ठेवले. सखुबाई रडत होत्या,देवाला प्रार्थना करत होत्या,सासुबाईला विनंती करत होत्या की मला सोडा. रात्रीचे बारा वाजले होते. भक्ताला बांधल्यावर भगवंत कसे शांत बसतील. आणि साक्षात पांडुरंगाणे तिच्या पतीचे रूप धारण करून सखुबाईला पंढरपूरला वारकऱ्यांसोबत दिंडीत जाण्याची परवानगी दिली.

स्वतःच्या हाताने पांडुरंगाने सखुबाईला बांधलेली दोरी सोडली आणि पांडुरंगाने लगेच सखुबाईचे रूप धारण करून तिच्या सासूबाईची घरातील सर्व कामे ते करू लागले. खऱ्या सखुबाई पंढरपूरला पोहोचल्या आणि भेटी लागी जीवा, पांडुरंगाचे गुणगान, पंढरपूरचे दर्शन भगवंताच्या चरणाच्या हरिनामाचा जयघोष यामध्ये सखुबाई तल्लीन झाल्या. इकडे भगवंत सखुबाईची सगळी कामे करत होते. कृष्णराया, गयाळीबाई आणि वडूरायाची सर्व कामे  करून स्वतः भगवंताने बनवलेले अन्न प्रसाद म्हणून हे सर्व खात होते. आणि पांडुरंगाच्या हातचे अन्न खाल्ल्यानंतर परिणाम असा झाला की हे लोक सात्विक झाले. त्यांच्यातील दुर्गुण फार कमी झाले इकडे सखुबाईंनी पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवला होता आणि भगवंत प्रेमाने सखुबाईने आपला जीव भगवंताच्या चरणावर सोडला होता. आणि सखुबाई अनंतात विलीन झाल्या.सखुबाईंचा मृत्यू पंढरपूर मध्येच झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी भक्तांनीच केला.

परंतु रुक्मिणी देवीला चिंता वाटत होती की सखुबाई घरी गेल्याच नाही तर भगवंत इकडे परत कसे येतील म्हणून रुक्मिणी देवीने सखुबाईच्या प्रेताला हात लावला आणि सखुबाईंना पुन्हा जीवदान दिले . आणि रुक्मिणी देवी म्हणाल्या हे सखुबाई धन्य आहेस तू तुझ्यासाठी स्वतः भगवंत तुझ्या रूपात तुझ्या घरच्यांची सेवा करत आहेत. तुझ्या घरातले लोक आता सात्विक झाले आहेत. तू तुझे पुढील आयुष्य आता तुझ्या कुटुंबास व्यतित  कर. सखुबाईच्या डोळ्यातून अश्रू आले. हे भगवंता  तुम्ही माझ्यासाठी हे काय केले आणि धावत त्या करवीर कडे घरी गेल्या आणि बघितले तर भगवंत घरी पाणी वाहत होते. हे पाहून सखुबाई दुःखी झाल्या. मग देव म्हणाले की तू मला प्रार्थना केली होतीस ना की तुझ्या घरातील सर्व लोक भक्त झाले पाहिजे. बघ आता सगळे सात्विक झाले आहेत. असे म्हणून भगवान अदृश्य झाले .संत सखुबाई यांच्या जीवनावर मराठी चित्रपट पण आहेत ते तुम्हाला Youtube वर पाहायला मिळतील.
     

Leave a Comment