तसे तर जगभर माणसाच्या स्वरूपात अनेक चेहरे येतात आणि जातात परंतु लक्षात तेच राहतात ज्यांनी स्वतः समाजासाठी आपली अनोखी ओळख दिली आहे आणि आपलं एक वेगळं रूप दाखवलेल आहे. तसेच ज्यांनी समाजाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. अशाच एक स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगणाऱ्या,ज्यांच्या अंगी आयुष्यभर दया आणि निस्वार्थ भाव होता अशा एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारताच्या नसून सुद्धा भारतात स्थायिक झालेल्या अल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी म्हणजे मदर तेरेसा ( Mother Teresa ) .
तेरेसा यांचे पूर्ण नाव अग्निस गाँकशा वाजकशियू असे होते. तिचा जन्म रोमन कॅथलिक अल्बेनियन कुटुंबात स्कोप्ये (युगोस्लाव्हिया) येथे झाला होता. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्याची मुलगी होती . तिचे बालपण फार सुखात गेले होते. नवीन चावला हे मदर तेरेसा यांच्या चरित्राचे अधिकृत चरित्रकार होते. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असतानाच ती सेवाकार्यात रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला होता. नंतर एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले.
त्या त्यांच्या कार्यानिमित्त कलकत्ता, पुढे त्या सन 1929 मध्ये भारतातील लोरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर त्यांच्या कार्यामुळे स्पॅनिश योगिनी संत तेरेसा च्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवा धर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने १९ वर्षे अध्यापन केले. पुढे ती प्राचार्य झाली. अध्यापन करीतअसताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे. त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत होते. किंबहुना हीच ईश्वर सेवा होय,असे विचार तिच्या मनात दृढमूल झाले.
एकदा दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला होता. तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले. या कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली होती आणि त्यानंतर तिने सन 1950 मध्ये कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली.पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले आणि तिच्या विचारांशी सहमत असणार्या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महिलांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली होती.

तेरेसाला तर काही लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत असायचे. तसेच त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या म्हणून अनेक लोक आरोपही करायचे. तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवर व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक स्वरूपातील गरजा भागवण्यासाठी तिने प्रयत्न केला. किंबहुना हीच ईश्वर सेवा होय, असे तिच्या मनात नेहमी असायचे.सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसा सह सेवाभावी महिलांची गरज यांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसाने जाणले होते आणि इतरांनाही दाखवून दिले.
तिच्या मताशी सहमत असलेल्या लोकांना हाताशी धरून या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन तिने केले आणि पुढे केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले. त्यानंतर अनाथ मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथाश्रम तयार केले. तसेच सन 1952 मध्ये मदर तेरेसा यांनी बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले. १९६४ मध्ये तेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली, कारण त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा होती. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.
पुढे तिच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे,फिरते दवाखाने, मरणोन्मुख यासाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व देशांत पसरवल्या. तेव्हा मात्र व्याप वाढल्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली होती. या संस्थां मध्ये १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु तेरेसा यांनी “मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी”ही वेगळी संघटना स्थापन करून सन 1983 मध्ये पुरूष सेवकांनाही त्यात प्रवेश दिला. आता या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात. त्यानंतर मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या शाखा व उपशाखा जगभर ५२ देशांत प्रसृत झाल्या असून एकूण २२७ ठिकाणी संस्थेची सेवाकेंद्रे आहेत. भारतात व इतर देशांत संस्थेने चालविलेल्या ९८ शाळा, ४२५ फिरती रूग्णालये, १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे,28 मुलांच्या शाळा, 48 अनाथ आश्रम आणि 62 आश्रमगृहे आहेत.
महाराष्ट्रात पुणे,औरंगाबाद, विलेपार्ले या ठिकाणी ही सेवा केंद्रे आहेत. मुंबई येथे आशादा नावाचे स्वीकार- गृह १९७६ मध्ये सुरू करण्यात आले आणि रूग्णालये व १०२ कुष्ठरोग उपचार केंद्रे तयार करण्यात आले. त्यात शिशुभवन, निर्मल हृदय व रूग्णांची सेवा या तिन्ही शाखा एकत्र केल्या आहेत. या संस्थासाठी लागणारा खर्च विविध देणग्यांतून तसेच तेरेसाला मिळालेल्या पारितोषिकांच्या रक्कमेतून करण्यात येतो. दारिद्र्य, भूक, दुर्दशा आणि गर्भपातादी प्रकार यांमुळे कोणत्याही देशाची शांतता धोक्यात येते, असे तिचे मत आहे. म्हणून प्रथम या शत्रूना दूर केले पाहिजे. असे नेहमीच तेरेसा यांनी त्यांचे विचार समाजापुढे मांडले.
यासाठी दुःखी व अपदग्रस्त लोकांची सेवा हाच एकमेव मार्ग आहे. पुढे या तिच्या सेवाकार्याची दखल घेऊन १९७९ चे शांततेचे नोबेल पारितोषिक तेरेसा यांना देण्यात आले होते. याशिवाय तिला त्रेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानसन्मान लाभले. त्यांपैकी 1962 मध्ये रॅमन मॅगसेसे पारितोषिक , 1971 मध्ये पोपचे शांतता पारितोषिक, 1972 मध्ये नेहरू पुरस्कार , 1979 मध्ये नोबल पुरस्कार, पद्मश्री देशिकोत्तमा आणि नॉर्वे लोकपारितोषिक. 1980 मध्ये भारतरत्न तसेच इतरही महत्त्वाची व मानाची पारितोषिक त्यांना देण्यात आली आहेत. तसेच विविध मान्यवर विद्यापीठांनी तिला डॉक्टरेट ही सन्मान्य पदवीही दिली आहे.
तसेच मदर तेरेसा या फार धाडसी असल्यामुळे 1982 मध्ये त्या युद्धभूमीत सुद्धा हिंडत असायच्या, त्यावेळी तिने १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यामध्ये वैचारिक समझोता करून रेडक्रॉसच्या साह्याने ३७ मुलांची सुटका केली होती. तसेच तिला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा अत्युच्च ब्रिटिश पुरस्कार राणी दुसरी एलिझाबेथ हिने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी तिच्या मानवतेच्या श्रेष्ठ सेवेबद्दल दिला. तसेच 1975 मध्ये मदर तेरेसाचे विचार स्फुटलेखांद्वारे ए गिफ्ट फॉर गॉड या पुस्तकात संकलित केले आहेत.’मदर ऑफ द मॅनकाइंड’ म्हणूनच तिच्या ठायी वसत असलेल्या मातृत्वाच्या भावनेला नेहमी गौरवाने उल्लेखण्यात येते.
तिचे कार्य अति- श्रमाचे आणि कष्टाचे आहे. पीडितांना प्रेम देऊन त्यांचे जीवन ससाह्य करण्याचा तिचा प्रयत्न जगन्मान्य झाला आहे. अपरिमित, आभाररहित अखंड कष्ट म्हणजेच मद तेरेसा, असे जणू आता समीकरणच झाले आहे.सन 1997 मध्ये मदर तेरेसा यांचे निधन झाल्यानंतर सन 2003 मध्ये एक महिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला होता. पश्चिम बंगालमधील ‘ह बसेरा’नावाच्या गावात एका महिलेच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसा यांच्या फोटोतून निघालेल्या दिव्यशक्ती मुळे पूर्ण बरी झाली असे त्या दाव्यात म्हटले गेले होते.
अशाच प्रकारे पुढे सन 2008 मध्ये केवळ मदर तेरेसा यांच्या नावाने प्रार्थना केल्याने ब्राझील मधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठींचे निरसन झाले होते असा दुसरा चमत्कार म्हणून दावा करण्यात आला होता. म्हणून पुढे इ.स. डिसेंबर 2015 मध्ये संत पद सोहळा झाला असताना मदर तेरेसा यांनी संत पदाची कसोटी पूर्ण केलेली असल्यामुळे 9 सप्टेंबर 2016 रोजी लाल वेटीकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस कडून मदर तेरेसा यांना संत उपाधी लावून विभूषित करण्यात आले.
अशा या महान संत वादी मदर तेरेसा यांच्यावर पुढे भारतरत्न मदर तेरेसा,मदर तेरेसा प्रतिमेच्या पुढे,दुःखितांची विश्वमाता,माणुसकीचा नंदादीप,विश्व माता अशी बरीच पुस्तके वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रकाशित झालेली असून जगभर मदर तेरेसा यांच्या चरित्राचा अभ्यास केला जातो. अशा देवरूपी, संत रुपी महा मातेला कोटी कोटी प्रणाम .
सुंदर 👌