महालक्ष्मी-कोल्हापूर | Mahalakshmi Kolhapur

हिंदू धर्मात श्री विष्णूची धर्मपत्नी समजल्या जाणाऱ्या महालक्ष्मी देवीला ऐश्वर्य देणारी देवता समजले जाते. देवीची मूळ प्रवृत्ती त्रिगुणात्मक परमेश्वर पराशक्ती  मुळे चतुर्भुज महालक्ष्मी, तमोगुणी चतुर्भुज महाकाली, आणि सत्वगुणी चतुर्भुज महासरस्वती अशी त्रिदेविची उत्पत्ती झाली असे म्हणतात. देवी महालक्ष्मीची सर्वशाद्या महालक्ष्मी, चंडिका महालक्ष्मी,श्री महालक्ष्मी आणि विष्णुप्रिया महालक्ष्मी अशी मूळ चार रुपे सांगितले जातात. तसेच महाराष्ट्रात महालक्ष्मीला ( Mahalakshmi Kolhapur ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी समजले जाते. ब्रह्मदेवांनी ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केल्या होत्या एक म्हणजे उत्तरकाशी कि जी काशी विश्वेश्वर म्हणून आहे आणि दुसरी म्हणजे दक्षिण काशी जी सर्वशाद्या महालक्ष्मीला मानले जाते.

दक्षिणकाशी देवीला अतिप्रिय होती त्यामुळे अनंत काळ महालक्ष्मीने येथे वास्तव्य केले होते. अकराव्या शतकामध्ये एका शिलालेखात देवीचा उल्लेख “लिंगशैषाघौषहारिणी” असा केलेला आहे. भारतातील आदिमाया शक्तीच्या 108 शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रात आहेत. या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ समजले जाणारे शक्तीपीठ कोल्हापूरला आहे. कोल्हापूरच्या या देवीला महालक्ष्मी, ( Mahalakshmi kolhapur ) अंबाबाई, व करवीर निवासिनी असेही म्हटले जाते.

त्याचप्रमाणे पानपात्र, लिंगयोनी आणि नाग अशी महत्त्वाची चिन्हे ही महालक्ष्मीची मुख्य ओळख आहे. अनेक पुराण, ग्रंथ आणि भागवत इत्यादी मध्ये त्रिदेवांच्या आधी सगुण साकार अशी निर्गुण निराकार एक शक्ती अस्तित्वात होती ती तापलेल्या लालबुंद सोन्याप्रमाणे देवी सारखी चतुर्भुज होती. या देवीची कोल्हापूरला येण्याची आणि कोल्हापूरला कोल्हापूर हे नाव पडण्याची एक कथा सांगितली जाते. सती मातेचे भगवान श्रीकृष्णांनी 108 भाग केले होते. या 108 भागांपैकी सती मातेचे नेत्र कोल्हापूर या ठिकाणी पडले होते. त्यामुळेच येथे आदिमाया शक्ती महालक्ष्मी येथे प्रकट झाल्याचे सांगितले जाते.

तसेच या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्णही आहेत असे म्हणतात. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील भावीक धन समृद्धीची देवता तसेच या ठिकाणाला मोक्षप्राप्तीचा मार्ग असे समजतात. एवढी ताकत आदिमाया शक्तीच्या या मूळ शक्तिपीठामध्ये आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.अनेकांच्या मते हे जगदंबेचे रूप आहे. आजही कोल्हापूरकर या देवीला अंबाबाई असेच म्हणतात.
येथील या महालक्ष्मीच्या मंदिराला दीड दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. येथील मंदिराचे मूळ निर्माण चालुक्य शासक कर्णदेव  याने सातव्या शताब्दी मध्ये हे मंदिर बांधले आहे. असा अनेक ग्रंथांमध्ये पुरावा आहे.

मंदिराची कलाकृती हेमाडपंती असून पुढे नंतर पुर्नरनिर्माण शिलहार यादव या राजाने नवव्या शतकामध्ये केल्याचे पुरावे आढळतात. देवीच्या मंदिराचे बांधकाम फार कलाकृती असून रेखीव आहे.या मंदिरावर मुघलांनी अनेक स्वाऱ्या केल्या होत्या. अशावेळी तेथील पुजाऱ्यांनी देवीची मूर्ती अनेक वेळा लपवून ठेवली होती. सन 1715 ते सन 1722 च्या काळात हिंदूंचे हे मुख्य श्रद्धास्थान असल्यामुळे या मंदिरावर अनेक स्वाऱ्या झाल्या. त्यावेळी स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक वेळा मंदिराचे संरक्षण केले आणि मंदिराचे वेळोवेळी बांधकाम केले. इतिहासामध्ये तसे अनेक पुरावे आहेत.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील चौथाऱ्यावरती आदिमाया शक्ती महालक्ष्मीची चार फूट उंचीची काळ्या दगडात कोरलेली उंच मूर्ती आहे. देवी जवळ सिंह प्रतिकृती आहे.देवीला चार हात असून तिच्या चारही हातामध्ये शंख, गदा,सुदर्शन, कमळ फुल अशी शस्त्रे आहेत. मातेच्या डोक्यावरती 40 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट असून देवीच्या कपाळावर मातुलिंग आहे आणि मुकुटावरती शेष नागाची रचना आहे. मंदिरामध्ये एक श्रीयंत्र कोरलेले आहे. हे श्री यंत्र आद्य शंकराचार्यांनी कोरलेले आहे असे म्हणतात.तसेच मंदिराचा आकारही श्री यंत्राप्रमाणे आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. परंतु या सर्व मंदिरांची तोंडे पूर्व उत्तर आहेत परंतु कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे तोंड हे पश्चिम दिशेला आहे. आदिमाया शक्तीचे असे हे एकमेव मंदिर आहे.  

पंचगंगा नदीच्या किनारी असलेल्या कोल्हापूरच्या या महालक्ष्मी मंदिरामध्ये सूर्यनारायण, नवग्रह, भगवान शिव, विठ्ठल रुक्मिणी, दुर्गा माता, आई तुळजाभवानी इत्यादी देवी देवतांची छोटी छोटी मूर्ती ठिकाने मंदिर परिसरामध्ये आहेत. तसेच येथे अनेक कुंड आहेत जसे, मनिकर्णिका कुंड तसेच विश्वेश्वर मंदिर आहे. तसेच मंदिरावर काही जैन मूर्ती आढळून येतात. तसेच शूर राणी पद्मावतीची रेखीव मूर्ती कोरलेली आढळते.काही काळ या परिसरात राणी पद्मावती राज्य करत होती. येथे त्या काळात ईडलिंबूच्या बागा होत्या. देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती राणीची मूर्ती कोरल्या असल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.

कोल्हासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता. त्याने देवी देवतांची कठोर तपचर्या केली होती. असे करून त्यांनी वरदान मागून घेतले होते कि, देव आणि दानव मला कोणीही मारू शकणार नाही. परंतु देवांनी वरदान देताना देव स्त्री शब्द बोलले नव्हते. पुढे त्याच्या अहंकारामुळे त्याने देव  देवतांना आणि साधूमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यानी असा डंका केला होता की ऋषींचे यज्ञही तो मोडत होता. कोल्हासूर ( Kolhasur ) राक्षसाच्या या छळाला कंटाळून सर्व ऋषीमुनी आणि भयभीत जनता आदिमाया शक्ती कडे आले आणि म्हणाले माते आम्हाला या राक्षसापासून वाचवा . त्यावेळी आदिमाया शक्तीने दुर्गा मातेचा अवतार धारण करून कोल्हासूर या महाभयंकर राक्षसाचा वध केला होता.

त्यावेळी कोल्हापसूर राक्षस आदिमाया शक्तीला शरण जाऊन म्हणाला की,हे आदिमाया शक्ती माझी अखेरची एक इच्छा तुम्ही पूर्ण करा. ती म्हणजे पुढच्या काळात हा संपूर्ण प्रदेश माझ्या नावाने ओळखला जाईल. दुर्गा मातेने त्याला तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून या प्रदेशाला कोल्हापूर असे नाव पडले. या महालक्ष्मी देवीच्या मंदिराला चार दिशांना चार प्रवेशद्वार आहेत. त्यातील पश्चिमेचे प्रवेशद्वार मुख्य समजले जाते. पूर्वेला मातेचा गर्भ ग्रह असून सभा मंडप आहे. गणपती गणेश मंडप आहे.त्याला साक्ष गणपती मंडप असे म्हटले जाते. तसेच येथे महाकाली महासरस्वती गर्भग्रह आहे. तसेच 18 व्या शतकातील यशवंतराव दाभाडे सरकारने आणि भैरवजी गायकवाड यांनी पूर्व दरवाज्याचे काम केले आहे. त्या ठिकाणी तसा शिलालेख सुद्धा आहे.

नवरात्र उत्सवामध्ये येथे फार मोठी यात्रा भरते. नऊ दिवस वेगवेगळ्या वस्त्रालंकरांनी देवीची पूजा केली जाते. देशभरातून अनेक भाविक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. तिरुपती बालाजी हे भगवान श्रीकृष्णांचे ठिकाण असून या ठिकाणावरून माता महालक्ष्मी रुसून कोल्हापूरला आल्याची कथाही सांगितली जाते. आजही तिरुपती बालाजी देवस्थान कडून कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला वर्षातून दोन वेळा साडी पाठवली जाते. तिरुपती बालाजीला जाणारे भक्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याशिवाय बालाजी तीर्थयात्रा पूर्ण होत नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे

एवढेच नव्हे तर वर्षातून दोन वेळा  जानेवारी आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वतः सूर्यनारायण म्हणजे सूर्यकिरणे मातेच्या पायावरती येतात. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये मावळतीची सूर्यकिरणे आई देवीच्या अंगावर पडतात.आजही हे पाहण्यासाठी अनेक भक्त तेथे जमत असतात. एक प्रकारे येथे त्यावेळेस मोठा उत्सव भरला जातो. साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज येथे दर्शनासाठी येत होते. त्याचप्रमाणे दरवर्षी येथे येणारे भाविक आई महालक्ष्मीची खणा नारळाने ओटी भरून मनोभावे श्रद्धापूर्वक आईचे दर्शन घेतात. अनेकांच्या नवसाला महालक्ष्मी पावते. अनेकांना देवीच्या कृपाशीर्वादामुळे निरोगी आयुष्य आणि धनसंपदा मिळाली असा भक्तांचा विश्वास आहे.

Leave a Comment