कुष्ठरोग्यांचे कैवारी, थोर समाजसेवक, भारतीय वकील, पर्यावरणवादी,अभ्यासू आणि उच्च शिक्षित बाबा आमटे ( Baba Amte ) आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे यांचे भारत देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. दोन्ही पती-पत्नीने 1950 मध्ये कुष्ठरोगी लोकांसाठी आनंदवन नावाची संस्था स्थापन केली होती. हे अग्रणी काम त्यांनी आरोग्याच्या समस्यांसाठी सुरू केले होते.
त्यांना त्यांच्या जीवनात डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार , महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गांधी शांती पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, टेम्पल रन पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. वडील देविदास आणि माता लक्ष्मीबाई आमटे यांच्या पोटी 26 डिसेंबर 1914 रोजी बाबा आमटे यांचा जन्म झाला. त्यांचे गाव वर्धा जिल्हात हिंगणघाट हे होते आणि ते एका देशस्थ ब्राम्हण कुटुंबातून होते. त्यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे असे असून त्यांच्या आई-वडिलांची श्रीमंती होती. वरवंडे गावापासून चार-पाच मैल अंतरावर असलेल्या गोरजे गावाची जमीनदारी बाबा आमटे यांच्या वडिलांकडे होती.
त्यांचे वडील जिल्हा प्रशासन आणि राजस्व संग्रहण मध्ये एक ब्रिटिश सरकारी अधिकारी होते. मुरलीधरला लहानपणीच आपल्या वडिलांचे उपनाव मिळाले होते. त्यांना सर्वजण बाबा नावाने ओळखत होते. ते कोणी संत नव्हते परंतु त्यांचे आई वडील त्यांना बाबा नावाने बोलत असायचे. त्यांच्या वडिलांना एकूण आठ अपत्ये होते. त्यातील बाबा आमटे हे सर्वात थोरले होते. त्यांच्या वडिलांकडे फार मोठा जमीन जुमला होता. त्यांच्या वडिलांची श्रीमंती असल्यामुळे त्यांचे बालपण अगदी मजेत गेलेले होते.
ज्यावेळी बाबा आमटे वयाच्या 14 व्या वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्याकडे स्वतःची एक बंदूक होती.तसेच ते जेव्हा गाडी चालवण्यासारखे झाले होते तेव्हा त्यांना एक स्पोर्ट कार वडिलांकडून देण्यात आली होती. त्यांच्याकडे अशा सुविधा असून सुद्धा ते नेहमी गरीब आणि हलक्या जातीतील मुलांबरोबर खेळत असायचे. तसेच त्यांच्या घरचे त्यांना यापासून रोखत नसायचे. त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच जातीभेद वर्णभेद आणि गरीब श्रीमंत भेद मानला जात नव्हता. बाबा आमटे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये पुढील शिक्षण पूर्ण करून त्यांनी कायदे कानून याचेही नॉलेज घेतले होते.
त्यांनी वर्धा मध्ये कायद्याचे संपूर्ण ज्ञान मिळवून काही स्वतंत्र कायदे तयार केले होते. त्यांचे शिक्षण बी.ए. एल एल बी असून डॉक्टर बनावे अशी इच्छा मनी बाळगलेल्या बाबा आमटे यांनी पुढे सन 1949 मध्ये कलकत्त्यामध्ये स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन येथे कुष्ठरोग यांच्या उपचारासाठी मेडिकल शिक्षण घेतले होते. त्याआधी ते लवकरच ब्रिटिश सरकार काळामध्ये भारतीय स्वतंत्रता संघर्षात सामील झाले होते. बाबा आमटे भारतीय स्वातंत्रता संघर्ष कमिटीमध्ये एक रक्षा वकील म्हणून काम पाहू लागले होते.
पुढे सन 1942 मध्ये भारत आंदोलनांमध्ये ज्या नेत्यांना कैद केले होते त्या सर्वांना बाबा आमटे यांनी तुरुंगातून सोडले होते.नंतर बाबा आमटे यांनी महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावीत होऊन सेवाग्राम आश्रमामध्ये काही काळ काढला. तसेच त्यांच्या जीवनाचा बराच काळ पुढे त्यांनी गांधी अनुयायी म्हणून व्यतीत केला. त्यांनी नेहमी गांधीवादाचे पालन केले. जसे की खादी वस्त्र,चरखा, आणि वस्त्र कटाई यामध्ये सहभाग घेतला. जेव्हा गांधीजींना माहीत झाले की त्यांनी एका ब्रिटिश सैनिकांच्या तावडीतून एका मुलीला वाचवले आहे. त्या मुलीला ब्रिटिश सैनिक फार तंग करत होते. तिला तरुण ब्रिटिशांच्या छेडछाडीतून बाबा आमटेंनी निडरपणे सोडले होते. त्यानंतर गांधीजींनी बाबा आमटे यांचे नाव अभय साधक, सत्याचे नीडर साधक म्हणून ठेवले.
त्यानंतर त्यांना अनेक लोक ओळखू लागले. त्याकाळी कुष्ठरोग एक सामाजिक कलंक झाला होता. बाबा आमटेंनी या अंधश्रद्धेला मिटून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि जनतेला जागृत केले होते की, कृष्ट रोग हा संक्रमण रोग नाही. ते सांगायचे की कुठल्याही कुष्ठरोग्याच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आली तरी त्याला कुष्ठरोग होऊ शकत नाही. तसेच त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करत नेहमीच कुष्ठरोग्यांना सहाय्य केले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही कुष्ठरोग चिकित्सेसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनेक आंदोलनात सहभाग घेतला.
त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर प्रसार करण्यासाठी भारत जोडो अभियान राबवले होते. भारतीय एकात्मता आणि आपले विचार पसरवण्यासाठी त्यांनी पंजाबसह भारतातील अनेक राज्यांमध्ये भ्रमण केले होते. बाबा आमटे यांनी महाराष्ट्रामध्ये कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी तीन आश्रमांची निर्मिती केली होती तसेच आनंदवन मध्ये 1949 साली एक दवाखाना काढला. गडचिरोली जिल्हात माडिया गोंड नावाचा समाज आहे, या समाजासाठी बाबा आमटे यांनी 1973 साली बिरादरी प्रकल्प स्थापन केला.
अशा प्रकारे त्यांचे जीवन त्यांनी लोककल्याणासाठी समर्पित केले होते. सर्वात महत्वपूर्ण म्हणजे त्यांनी भारत आंदोलन, परिस्थितीक संतुलन, वन्यजीव संरक्षण, आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे महत्व यासाठी जनजागृती केली होती. तसेच नर्मदा बचाओ आंदोलनामध्ये ज्यांनी बारा वर्षे नर्मदे जवळ मुक्काम ठोकला होता. तसेच वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी नीट इंडिया मिशन फॉर पीस आंदोलनामध्ये कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत पायी चालत सुरू केले होते. त्यानंतर तीन वर्षांनी आसाम ते गुजरात पायी प्रवास करत त्यांनी दुसरे आंदोलन केले. समाजातील कर्णबधिर,अपंग, अंध, आदिवासी, कर्णबधिर, दुर्लक्षित,वंचित दिन दुबळे, आणि गरीब लोकांना माणूस म्हणून सामान्य जीवन जगण्यासाठी बाबा आमटे यांनी उभं आयुष्य झिजवले होते.
पुढे सन 1971 मध्ये त्यांना भारत सरकार मार्फत पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. नंतर सन 1990 मध्ये बाबा आमटे यांनी आनंदवन सोडले आणि नर्मदा बचाव आंदोलन मध्ये ते सामील झाले. तेथे त्यांनी सरदार सरोवर बांध बनवण्यासाठी संघर्ष केला आणि सरदार सरोवराच्या किनारी होणारी घाण रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. बाबा आमटे यांचे लग्न इंदू घुले म्हणजेच साधना आमटे यांच्याशी झाले होते. त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्याबरोबर नेहमी सामाजिक कार्यामध्ये भाग घेत होती. बाबा आमटे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नीने नेहमी समाजकार्यात सहभाग घेतला होता. बाबा आमटे यांना दोन मुले होती. एक म्हणजे डॉ.विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे. तसेच त्यांच्या दोन सुना डॉ. मंदाकिनी आणि डॉ. भारती हे चारही डॉक्टर आहेत.
तसेच या चौघांनीही सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले आहे. त्यांचे वारसदार नेहमीच त्यांच्या वडिलांच्या ध्येयप्राप्तीवर लक्ष ठेवून काम करत राहिले. गडचिरोली जिल्ह्यात हेमलकसा ( Hemalkasa) या गावात बाबा आमटे यांचा मुलगा डॉ प्रकाश आमटे आणि त्याची पत्नी डॉ मंदाकिनी आमटे यांनी माडिया गोंड समाजासाठी एक हॉस्पिटल आणि एक शाळा चालवली. प्रकाश आमटे बरोबर लग्न केल्यानंतर डॉ मंदाकिनी आमटे यांनी गव्हर्मेंट मेडिकल मधील सरकारी नोकरी सोडली आणि शाळा आणि हॉस्पिटल चालवण्यासाठी पतीला मदत करू लागली. तसेच जंगलामध्ये आजारी पडलेल्या आणि जखमी झालेल्या प्राण्यांची सेवा करत होती.

डॉ प्रकाश आमटे यांनाही दोन मुले आहेत. पहिला दिगवत डॉक्टर आहे आणि दुसरा मुलगा अनिकेत इंजिनियर आहे.
या त्यांच्या दोन्ही मुलांनी सुद्धा अनेक सामाजिक कार्य केले आहेत. सन 2008 मध्ये डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या सामाजिक कार्याला पाहून त्यांना मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बाबा आमटे यांचा मोठा मुलगा डॉ.विकास आमटे आणि त्याची पत्नी डॉ.भारती आमटे हे दोघे आनंदवन मध्ये एक हॉस्पिटल चालवत आहेत. तसेच तेथे अनेक ऑपरेशन सुद्धा ते करत आहेत. सध्या हेमलकसा गावामध्ये एकच हॉस्पिटल आहे. आनंदवन मध्ये एक युनिव्हर्सिटी, एक अनाथाश्रम आणि एक अंध आणि गरीब लोकांसाठी शाळा सुद्धा आहे . सध्या आनंदवन ( Anandvan ) आश्रमामध्ये जवळ जवळ पाच हजार लोक राहतात.
महाराष्ट्रामधील हा आनंदवन लोकसेवा विकास पूर्ण देशामध्ये पाहिला आणि ओळखला जातो.आनंदवन नंतर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सोमनाथ आणि अशोक वन आश्रमाची सुद्धा स्थापना केली होती. बाबा आमटे नेहमी म्हणायचे मी कोणी महान नेता नसून एक माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहे. मी गरजवंतांना मदत करू इच्छित आहे. मी स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यासाठी जीवन जगू इच्छित आहे. या संसारामध्ये काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही लोक देशासाठी जगतात.
तसेच काही लोक समाजासाठी जगतात. असे महान सतपुरुष होते बाबा आमटे. त्यांनी त्यांचे जीवन परोपकारसाठी समर्पित केले होते. ते नेहमी म्हणायचे “नर ही नारायण है!” शेवटी 9 फेब्रुवारी 2008 मध्ये बाबा आमटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या आनंदवन आश्रमामध्ये निधन झाले.
👌👌