अक्षय तृतीया | Akshaya Tritiya

अनोख्या आणि अद्भुत भारतीय संस्कृतीत ब्रह्मपुत्र अक्षय कुमार यांचा जन्म या तृतीयाच्या दिवशी झाला म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया ( Akshaya Tritiya ) असे म्हणतात. तसेच याच दिवशी सतगुण आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली असे सांगितले जाते.अक्षय तृतीया हे असे पर्व आहे की ज्या मुहर्तावर केलेले काम कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या कामाच्या फळाचा कधीही नाश होत नाही. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी हा

दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. अक्षय तृतीयाच्या दिवशी सूर्य ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजे मेष राशीत असतो आणि चंद्र ग्रह सुद्धा आपल्या उच्च राशीत असतो. सूर्य आणि चंद्र दोन्ही ग्रह आपल्या उच्च राशीत असतात. त्यामुळे सूर्य आणि चंद्र दोनही ग्रहांचे एकत्र कृपेचे फळ हे अक्षय असते. अक्षय चा अर्थ ज्याचा कधी नाश होत नाही किंवा क्षय होत नाही असा होतो. त्यामुळे असे मानले जाते की अक्षय तृतीयाला आपण काही जर शुभ काम केले तर त्याच्या परिणामांचा कधीही क्षय होत नाही. त्या कामाचे शुभ परिणाम कधीही नष्ट होत नाहीत. अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष करून भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा महत्त्वाची मानली जाते.

या दिवशी अनेक जण विधी पूर्वक चंदनाने भगवान विष्णूची पूजा करतात. असे केल्याने कुटुंबामध्ये आपापसात सामंजस्य येऊन भरभराट होते. तसेच अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रीहरी नारायणाचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा अवतार झाला होता. तसेच या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडे होतात. तसेच वर्षातून एकदा वृंदावन मध्ये भगवान बांके बिहारीच्या चरणांचे दर्शन होते. त्याचप्रमाणे अक्षय तृतीया चा दिवस क्षमा प्रार्थना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

या दिवशी आपल्याकडून वर्षभरात इतरांकडे व्यवहार करताना किंवा इतर कर्म करताना जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितल्यामुळे त्या चुकांना माफी मिळून आपल्याला ईश्वराकडून सद्गुण आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. अशाप्रकारे हा दिवस क्षमा प्रार्थना करण्यासाठी प्रमुख आणि महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कर्म केल्याने दुर्भाग्याचे सौभाग्य रूपांतर होते. या दिवशी शुभ कार्य आणि दान पुण्य करण्याबरोबरच आपल्या पितरांचे दर्पण किंवा पिंडदान करणे ही महत्त्वाचे मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करणे शुभ मानले जाते.

उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या अक्षय तृतीयेला थंड पाण्याने भरलेले भांडे दान केल्यामुळे पितरांना शीतलता येते किंवा पितृदोष कमी होऊन आपल्यावर पितरांचा आशीर्वाद राहतो असे म्हणतात. अक्षय तृतीया च्या मुहर्तावर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. तसेच अनेक वस्तूंचे दानही करणे या दिवशी शुभ मानले जाते. खास करून या दिवशी अशी मान्यता आहे की जर या दिवशी सोने खरेदी केले तर वर्षभर घरी सोने येत राहते. तसेच वर्षभर जीवनात संपन्नता येत राहते. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणे सर्वात जास्त

शुभ मानले जाते. त्यामुळे धन प्राप्ती होते आणि दान केल्याचे पुण्य अक्षय राहते. सोने खरेदीसाठी हा वर्षातील एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त न काढता शुभ कामे केली जातात. जसे की गृहप्रवेश करणे,लग्न करणे, वाहन खरेदी करणे किंवा कुठलेही मंगल कार्य या दिवशी होऊ शकते. अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुरामाचा अवतार झाल्यामुळे या दिवशी सूर्यास्त झाल्यानंतर लगेच भगवान परशुरामाच्या फोटोची पूजा करावी. विशेष करून दक्षिण भारतात अनेक

जण ही पूजा करतात. याबरोबरच आजच्या दिवशी उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या तटावर असलेल्या प्रसिद्ध बद्रीनाथ तीर्थस्थळी मंदिराचे दरवाजे उघडे होतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास जवळजवळ सहा महिने बद्रीनारायण मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. ते अक्षय तृतीयाच्या दिवशी उघडले जातात. विशेष म्हणजे मंदिर बंद असताना सुद्धा मंदिरामध्ये पेटवलेली ज्योत सतत सहा महिने तसीच अखंड पेटती राहते. मंदिर उघडल्यानंतर भगवान बद्रीनाथ नारायण देवाची विशेष पूजा केली जाते. त्यानंतर भगवान बद्रीनाथ नारायणाच्या मूर्तीला तेथून 40 मैल दूर असलेल्या ज्योतीनिर्मणच्या नरसिंह मंदिरात नेहून ठेवले जाते.

त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर त्या मूर्तीला परत बद्रीनाथ मंदिरात आणून ठेवले जाते. म्हणून या दिवशी अनेक भावीक बद्रीनाथ दर्शनासाठी आणि अखंड प्रज्वलित ज्योत पाहण्यासाठी येथे येतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी देवीला लाल किंवा गुलाबी रंगाची साडी किंवा फुल अर्पित करणे शुभ मानले जाते. तसेच चिमूटभर हळद लाल कपड्यांमध्ये बांधून ती तिजोरी मध्ये ठेवतात. तसेच पाच रुपयाच्या नाण्याला चंदनाचा टिळक लावून तुळशीपाशी किंवा श्री कृष्णाला अर्पित करणे शुभ मानले जाते. या दिवशी जमीन, सोने, चांदी, गाय, तीळ, मीठ,मध दान करणे पुण्याचे ठरते.

तसेच या दिवशी कन्यादान करणे अतिशय शुभ मानले जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी “ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:” हा मंत्र जप करणे फायद्याचे ठरते. तसेच या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटो घरी आणणे शुभ मानले जाते. या दिवशी शिव मंदिरामध्ये मातीचे भांडे दान केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. घरात एखाद्याचे लग्न जमत नसेल किंवा लग्न कार्यासाठी अडथळे येत असतील तर या दिवशी एक नारळ घेऊन आपल्या कुलदेवतेला किंवा आपला विश्वास

असणाऱ्या देवतेला स्मरून तसेच आपले गोत्र स्मरण करून वडाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून तो नारळ नारळाच्या झाडाखाली ठेवून द्यावा. असे केल्याने विवाहाच्या अडचणी दूर होतात. तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्रीच्या वेळी पिवळ्या कपड्याच्या अस्तरावर पूर्व दिशेला तोंड करून तसेच हातात मूठभर गहू ठेवून माता पार्वतीच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केल्याने किंवा स्मरण केल्याने विवाह बाधा दूर होतात. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण पवित्र नदीत स्नान करून देवी देवतांची पूजा करणे, उपवासाचे व्रत करणे, शुभ खरीदारी करणे, दान कर्म करणे अतिशय शुभ मानले जाते.

अक्षय तृतीयेला एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी बोलावून त्याला आपले पित्र समजून जेवू घातले जाते . कुंभाराकडून मातीची मडकी आणून त्यात पाणी ठेवले जाते . आलेला पितर जेवल्यानंतर त्याला त्या मडक्यातून थंड पाणी पिण्यासाठी दिले जाते. त्या व्यक्तीला गंध लावून त्याचे दर्शन घेतले जाते , त्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळून ते आशीर्वाद देतात अशी परंपरा आहे

Leave a Comment